प्रिय पल्लू,
मी कधीच तुला समजून घेतलं नाही,असा विचारही मनात करून घेऊ नकोस......
तुझ्या पासून मला कधीच दूर जाऊ नकोस....
तू हसलीस की मनाला खूप बरं वाटतं, तू गप्प बसलीस की मनाला खुप रडावसं वाटतं....
तू सोबत असताना मला कोणीच कसं आठवत नाही, पण तुझं दुसऱ्याशी माझ्या एवढा जीव लावनही मला खपत नाही... !
मी कधीच असं म्हणणार नाही, की माझ्या एवढा जीव, माझ्याएवढी मैत्री, तू दुसऱ्या कुणाशी ही करू नकोस......
पण या सर्वांमध्ये मलाही विसरू नकोस....
मी कधीच तुझी नव्हती, असं तू कधी बोलू नकोस, मी शेवट पर्यँत तुझीच आहे, हे तू मात्र विसरू नकोस.....
मी कधी चुकत नाही, असं मी म्हणणार नाही, मान्य करते मी माझ्यामुळेच आपण दोघी एकमेकींना वेळ देऊ शकत नाही... आणि दिला तरी तो कुणालाच खपत नाही, मला जे वाटत असले कदाचित तुला इथे वाटत असेल, मी लिहिलेली कविता जर तू मनात साठवत असेल....
आता मी ठरवलं शहाण्यासारखं वागायचं, जेवढा वेळ तुझ्यासोबत घालवता येईल तेवढा तुझ्यात वेळ घालवायचं....
आणि मी फक्त तुझीच मैत्रीण आहे हेच फक्त सांगायचं....
तुझीच नूतन.
0 टिप्पणियाँ